मुंबई : या वर्षी ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ने नफ्यात ८२ टक्क्यांनी वाढ करून ‘एलआयसी’ला मागे टाकले आहे. २०१७मधील आर्थिक वर्षात ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’चे ‘रिटेल प्रीमियम कलेक्शन’ ४०३ कोटी रुपये एवढे झाले आहे. नवीन व्यवसायातून कंपनीला या वर्षी १८१ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. २००९मध्ये स्थापना झाल्यापासून कंपनीने सर्वांत जास्त फायदा या वर्षी मिळवला आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’तर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
‘आयआरडीए’नुसार, साधारणतः लाइफ इन्शुरन्स कंपनी वर्षात २६ टक्के वाढ करू शकते. ‘एलआयसी’ने एकूण ३९ टक्के वाढ केली आहे. व्यक्तिगत प्रकारात ८२ टक्क्यांच्या वाढीसह ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ने अव्वल नंबर पटकावला असून, ‘टाटा एआयए’ने ७३ टक्के, तर ‘फ्युचर जनरली’ने ४४ टक्के आणि ‘एसबीआय लाइफ’ने ३९ टक्के वाढ केली आहे. ‘रिलायन्स लाइफ’ला २३ टक्के तोटा झाल्याचे सांगण्यात आले आहे.